गुरुवर्य सप्तरंगी परिपाठ

🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷
------------------------------------------ 
  🎄 *आजचा परिपाठ🎄
-----------------------------------------
         🔅 *पंचांग* 🔅
 तिथी - चैत्र सप्तमी
 पक्ष - शुक्ल 
 शके - १९४८
 नक्षत्र : मृग
 सूर्योदय - ६ वा.३५ मि.
 सूर्यास्त - ६ वा.४६ मि.
 दिनांक - २५ /३ /२०२६
 वार - बुधवार  
 महिना : मार्च
 ----------------------------------------
      🔅 *सुविचार* 🔅
जो कर्तव्याला जागतो, तो कौतुकास पात्र होतो.
 Who wakes to duty, He deserves praise.
------------------------------------------
       🔅 दिनविशेष 🔅 
२५ मार्च  महत्वाच्या घटना :
२०१३: मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना
२०००: १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.
१९९७: जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.
१८९८: शिवरामपंत परांजपेकाळ हे साप्ताहिक सुरू झाले.
२५ मार्च जन्मदिन : 
 १९५६ः मुकूल शिवपुत्र - ग्वाल्हेर घराण्याचे गायक
१९४७: सर एल्ट्न जॉन - इंग्लिश संगीतकार व गायक
१९३७: टॉम मोनाघन - डॉमिनोज पिझ्झाचे निर्माते
१९३३: वसंत गोवारीकर - भारतीय हवामान शास्त्रज्ञ - पद्म भूषण, पद्मश्री 
१९३२: व. पु. काळे - लेखक व कथाकथनकार 
१८६७: गस्टन बोरग्लम - माऊंट रशमोअरचे शिल्पकार 
२५ मार्च निधन :
  २०१५: इंद्र बानिया - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार 
१९९३: मधुकर केचे - साहित्यिक 
१९९१: वामनराव सडोलीकर - जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक 
१९७५: दिवा जिवरतीनम - भारतीय वकील आणि राजकारणी 
१९७५: फैसल - सौदी अरेबियाचा राजा
१९४०: रजनीकांत बर्दोलोई - आसामी कादंबरीकार 
१९३१: गणेश शंकर विद्यार्थी - भारतीय पत्रकार आणि राजकारणी 
-----------------------------------------
       🔅 *बातम्या* 🔅
 पेढा, नरबळी, रिव्हॉल्व्हरवर राजमुद्रा; अशोक खरातबाबत वकिलांची नाशिक सत्र न्यायालयात  हादरवणारी माहिती

कुणाच्यातरी महत्वाकांक्षांचे पंख छाटण्यासाठी अशोक खरात प्रकरणाचा वापर राज ठाकरेंचं बेधडक विधान

मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून येवला तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात कालव्याद्वारे पाणी पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा जागृत झाल्या आहेत.छगन भुजबळ आणि समीर भुजबळांची 'पाणीदार' कामगिरी

शिक्षणासाठी घरापासून ९ वर्षे लांब, सलग ४ वेळा अपयश, पाचव्या प्रयत्नात UPSC क्रॅक; सिक्युरिटी गार्डचा मुलगा होणार सरकारी अधिकारी

युद्धाची झळ भारतापर्यंत पोहोचली ते एलपीजीच्या उपलब्धतेवर झालेल्या परिणामामुळं.
------------------------------------------
  🎄 **व्यक्तीविशेष* 🎄
      🔅 व.पु. काळे  🔅
 वसंत पुरुषोत्तम काळे म्हणजेच व.पु. यांचा जन्म २५ मार्च १९३२ रोजी झाला. व. पु. काळे हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते. व. पु. काळे यांचे विचार साहित्य रसिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. हसता हसता डोळ्यात पाणी आणणारा असा त्यांचा विनोद असे. विशेषत: तरुणाईच्या मनावर वपुंनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून गारूड केले होते. जगणे हीसुद्धा एक कला आहे, ती आपण अवगत करायला हवी, असा संदेश ते अगदी सहज देऊन जात असत.
व. पु. या २ शब्दावर तमाम रसिक अजूनही प्रेम करत आहेत. त्यांचे विचार आदानप्रदान करत आहेत. व. पु. मुंबई महानगरपालिकेत होते. पेशाने वास्तुविशारद होते. पण वास्तू साकारताना त्यांनी किती सुंदर सुंदर पुस्तके आपल्या मराठी मातृभाषेत लिहिली याला तोड नाही. वपुंचे मराठी लिखाण सामान्य माणसाच्या जीवनाला भिडणारे, समृद्ध करणारे आहे. आपण सारे, अर्जुन, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हरवलेली माणसं, दोस्त, माझ्या माझ्यापाशी, मी माणूस शोधतोय, वन फोर द रोड, रंग मनाचे, माणूस, वपुर्झा, हुंकार असे पत्रसंग्रह, ललीतप्रकार खूपच प्रसिद्ध आहेत. तसेच तप्तपदी ठिकरी व वाट एकटीची यासारख्या कादंबर्‍या खूपच गाजल्या.
आपल्या लिखाणातून जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या पण रंजक पद्धतीने सांगणारे थोर साहित्यिक म्हणजे वसंत पुरुषोत्तम काळे. ‘वपु’ या दोन अक्षरांनी महाराष्ट्राला परिचित असलेल्या व. पु. काळे यांचा वाचकविश्वात स्वतंत्र असा संप्रदाय आहे. वपुंनी ६० पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण केलं. त्यातील पार्टनर, वपूर्झा, ही वाट एकटीची यांचे कथाकथन त्यांनी स्वतः केलं. या कथाकथनाला प्रेक्षकांनी भरपूर दाद दिली आणि ऑडिओ कॅसेटमधून घराघरात पोहोचणारे वपु पहिले लेखक ठरले. पेशाने आर्किटेक्ट असणारे वपु इमारतींच्या आराखड्याचे रेखन करण्यापेक्षा लेखन करू लागले आणि मराठी साहित्याला एक थोर साहित्यिक लाभला.
वपुंचं लिखाण चौफेर होतं. कथा, ललित, नाटक, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र्य असे सर्व लेखन प्रकार त्यांनी हाताळले. लेखनातली विशेष बाब म्हणजे कथा संपताना कथेत अचानक येणारा ट्विस्ट. त्यांच्या कथा जिवंत माणसांच्या, नातेसंबंधांच्या, स्वैर वेड्या मनाचे विविध कंगोरे अधोरेखित करणार्‍या असत. वपुंची कथा वाचताना डोळ्यासमोर कथेचे कथानक तरळते. कथा वाचून झाल्यावरही त्यातले एक एक प्रसंग स्लाइड शोप्रमाणे डोळ्यासमोरून सरकत राहतात. लेखकाला कथा आपली वाटावी(च) असंच वपु लिहीत असत. वपुंच्या पार्टनर, झोपाळा, आपण सारे अर्जुन, ऐक सखे, चतुर्भुज, काही खरं काही खोटं अशा अनेक पुस्तकांवर, त्यांच्या कादंबर्‍या आणि कथांवर वाचकप्रियतेची मोहोर उमटली आहे.
त्यांचे ‘पार्टनर’ हे पुस्तक भरपूर लोकप्रिय आहे. त्यांच्या सर्व लेखनाचे, कथाकथनाचे श्रेय त्यांनी त्यांच्या पुण्याच्या चिंचोरे गुरुजींना दिले होते. व.पु. काळेंना ‘महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान’, ‘पु.भा.भावे पुरस्कार’, ‘फाय फाऊंडेशनचा पुरस्कार’ आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले. सोशल नेटवर्किंग साइट्सवरही वपुंच्या नावाची पाने तयार केली जातात. त्यांचे निवडक विचार, त्यांच्या पुस्तकांच्या समीक्षा या पानांवर शेअर केल्या जातात. वपुंच्या चाहत्यांची संख्या हळूहळू वाढत असून त्यात तरुणांची संख्या जास्त आहे. अशा या थोर लेखकाचे २६ जून २००१ रोजी निधन झाले.  
---------------------------------------
   🎄 *सामान्यज्ञान* 🎄
      आयुर्वेदिक वनस्पती 
         🔅घायपात 🔅  
शेतजमिनीच्या बांधावर लागवड केली जाणारी घायपात वनस्पती घायाळ म्हणूनही ओळखली जाते. ही अगेव्हसी कुलातील अगेव्ह प्रजाती असून तिच्या अनेक जाती आढळून येतात. ही वनस्पती मूळची मेक्सिकोतील तसेच अमेरिकेच्या दक्षिणेकडील संयुक्त संस्थानांतील असून तिचा प्रसार दक्षिण यूरोप, आफ्रिका, वेस्ट इंडिज, भारत, श्रीलंका या देशांत झाला आहे. पंधराव्या शतकात पोर्तुगीज लोकांनी ही वनस्पती भारतात आणली. भारतात हिची लागवड कर्नाटक, तमिळनाडू, केरळ व महाराष्ट्र या राज्यांत मोठ्या प्रमाणावर केली जाते.घायपात या एकदलिकित बहुवर्षायू वनस्पतीचे खोड लघुस्तंभीय, अर्धकाष्ठमय असून जमिनीवरील खोडाचा भाग पानांच्या वर्तुळाकार गुच्छाने वेढलेला असतो. पाने साधी, लांब, मांसल, टोकदार, बिनदेठाची, चिवट व मेणचट असतात. त्यांचा रंग करडा हिरवा असून दोन्ही कडांवर व टोकांवर तीक्ष्ण व लहान काटे असतात. या वनस्पतीला प्रादेशिक हवामानानुसार दहा ते साठ वर्षांदरम्यान एकदाच फुलोरा येतो. फुलोऱ्याचा दांडा तळाशी सु.१५ सेंमी. जाड असून ६ – १० मी. उंच असतो. तो खोडाच्या मध्यातून येतो.
फुले पांढरी, झुपक्या-झुपक्यांनी येतात. फळात अनेक बिया असतात. बिया चपट्या, काळ्या व पातळ असतात. फुलोरा येऊन गेल्यावर झाड मरते. फुलोऱ्यातील लहान कंदिकांपासून तसेच मूलक्षोडापासून येणाऱ्या अधश्चरांपासून नवीन वनस्पती तयार होतात.
घायपाताची मोठी पाने पोटिसासाठी वापरतात. पानांचा रस सारक, आर्तवजनक व रक्तपित्तनाशक आहे. मुळे स्वेदकारी व गरमीनाशक आहेत. दांड्यातील रसापासून साखर व शिर्का तयार करतात. रस्त्याच्या व लोहमार्गाच्या दुतर्फा, कुंपणासाठी तसेच उताराच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी ही वनस्पती लावतात. तिच्या पानांपासून उपयुक्त धागा (वाख) मिळतो. तो लांब, मजबूत व भरभरीत असून दोर व दोरखंड करण्यासाठी वापरतात. याखेरीज चटया, पायपुसणे, गालिचे, जाडेभरडे कापड, स्वस्त प्रतीचे ब्रश व खुर्चांच्या गाद्या तयार करण्यासाठी वाख वापरला जातो.
----------------------------------------
      🔅 *वाक्प्रचार* 🔅
 आळ घेणे - आरोप करणे , ठपका ठेवणे
----------------------------------------
         🔅 *म्हण* 🔅
 गरज सरो , वैद्य मरो - आपले काम संपताच उपकार कर्त्याला विसरणे
-----------------------------------------
       🔅इंग्रजी प्रश्न 🔅
1) Name the National river of India?
Ans. Ganga
2)Name the National Reptile of India?
Ans. King Cobra
3) What is the capital of India?
Ans. New Delhi
4)Name the biggest continent
in the world?
Ans. Asia
5) How many continents are there in the world?
Ans. 7 continents
------------------------------------------
       🎄 *प्रार्थना*🎄
🔅नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा 🔅
 नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।। धृ. ॥
शब्दरूप शक्ति दे, भावरूप भक्ती दे प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा, चिमणपाखरा ज्ञान मंदिरा ... सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा ।।१॥
विद्याधन दे आम्हांस, एक छंद एक ध्यास नाव नेई पैलतीरी दयासागरा, दयासागरा ज्ञान मंदिरा ... सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा ॥२॥
होऊ आम्ही नीतिमंत, कलागुणी बुद्धीमंत कीर्तिचा कळस जाई उंच अंबरा, उंच अंबरा ज्ञान मंदिरा ... सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा ॥३॥
-----------------------------------------
      🔅मनाचे श्लोक 🔅
मना मत्सरे नाम सांडूं नको हो।
अती आदरे हा निजध्यास राहो॥
समस्तांमधे नाम हे सार आहे।
दुजी तूळणा तूळितांही न साहे
॥८१॥

बहु नाम या रामनामी तुळेना।
अभाग्या नरा पामरा हे कळेंना॥
विषा औषधा घेतले पार्वतीशे।
जिवा मानवा किंकरा कोण पुसे
॥८२॥

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो।
उमेसी अती आदरें गूण गातो॥
बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें।
परी अंतरी नामविश्वास तेथें
॥८३॥

विठोने शिरी वाहिला देवराणा।
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥
निवाला स्वये तापसी चंद्रमौळी।
जिवा सोडवी राम हा अंतकाळीं
॥८४॥

भजा राम विश्राम योगेश्वरांचा।
जपू नेमिला नेम गौरीहराचा॥
स्वये नीववी तापसी चंद्रमौळी।
तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं
॥८५॥
------------------------------------------
     🎄 बडबडगीत 🌲 
 🔅नाच रे मोरा🔅
 नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच !

ढगांशि वारा झुंजला रे
काळाकाळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !

झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !

थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !

पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझिमाझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !
------------------------------------------
         🌲समूहगीत🌲 
🔅बलसागर भारत होवो      🔅
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो

हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
 
कवी : साने गुरुजी
-----------------------------------
      🌲 *बोधकथा*🌲  
 🔅ससा आणि कासव 🔅 
एका जंगलामध्ये एक ससा आणि कासव राहत होते ससा हा नावाप्रमाणे चतुर आणि चपळ आणि कासव थोडे मंद असते. परंतु दोघांची चांगली मैत्री असते.
एकदा सशाच्या मनामध्ये कासवा सोबत पैज लावण्याची इच्छा होते व तसे ससा कासवाला म्हणतो की, आपल्या दोघांमध्ये पैज लावूया जो कोणी या पैजमध्ये जिंकेल तो सर्वश्रेष्ठ असेल. ठरल्याप्रमाणे कासव देखील पैज लावायला हो म्हणतो. त्यावर ससा कासवाला म्हणते की जो कोणी समोरच्या टेकडी पर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल तो ही शर्यत जिंकेल.
ठरल्या प्रमाणे दुसर्या दिवशी कासवाची आणि सशाची पैज लागली. ससा होता चटळ ससा शर्यतीमध्ये सुरुवातीलाखूप धावत पळत सुटला आणि कासव हळूहळू शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करीत होते.
थोडे पुढे धावत आले आणि त्याने मागे वळून पाहिले तर त्याला कासव कोठे ही दिसले नाहीत त्यावर कसा म्हणाला, ” ्जोपर्यंत कासव माझ्यापर्यंत पोचतील तोपर्यंत एक झोप घेतो.” असे म्हणून ससा एका झाडाखाली एक विश्रांतीसाठी थांबला.
कासव हळूहळू चालत ससापर्यंत आले व कासवाने पाहिले ते ससा विश्रांतीसाठी झोपला आहे.
कासव आपल्या मंद पावलाने हळूहळू टेकडीच्या दिशेने चालतं होते. कासव टेकडी पर्यंत पोचणार तोच सशाला जाग आली. ससा उठून पाहतो तर काय कासव त्याला कोठेही दिसेना त्यावर ससाने टेकडीच्या दिशेने धाव घेतली व तेथे गेल्याने त्याला कळाले की ही शर्यत कासवाने जिंकलेली आहे.
अशाप्रकारे ससा च्या चपळता पुढे कासवाचा प्रयत्न जिंकला.
तात्पर्य :  कधीही कोणाला कमी समजू नये व प्रयत्न केल्यानंतर यश आपोआप मिळते.
------------------------------------------
       🔅 प्रश्नमंजुषा 🔅
१) वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
उत्तर: कार्बन डायऑक्साईड
२) कोणाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय(Anemia) हा रोग होतो ?
उत्तर: लोह
३) पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी काय वापरण्यात येते ?
उत्तर : क्लोरीन
४)कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास
रात अंधाळेपणा हा रोग होतो ?
उत्तर: 'अ' जीवनसत्व
५) त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे
प्राप्त होतो?
उत्तर : मेलानिन
🔸🔸  🔸🔸🔸🔸🔸🔸
---------------------------------------

42 comments:

  1. एक परिपूर्ण ब्लॉग ...👌👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर व परिपूर्ण रचना केलेली आहे. अभिनंदन भागवत सर.💐💐👌👌💐💐👌👌

    ReplyDelete
  3. Exllent sir ..

    ReplyDelete
  4. खूप छान सर 👌👌

    ReplyDelete
  5. दैनंदिन परिपाठ उपक्रम हे विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भावी आयुष्यातील वाटचालीस नकळत संस्कार प्रदान करत असते,आणि एक सज्जन नागरिक तयार होण्यास याच संस्कारांची अत्यन्त गरज आहे, आणि तेच संस्कार परिपाठ या माध्यमातून आपण देत असतो, तुमचे दैनंदिन परिपाठ आम्हाला खूप उपयुक्त ठरते, thanks bhagwat sir,

    ReplyDelete
  6. आपला परीपाठ इंग्रजी मधून मीळतो का ?

    ReplyDelete
  7. खूप खूप छान माहिती असते...

    ReplyDelete
  8. खूपच सुंदर परिपाठ,,,

    ReplyDelete
  9. खूपच छान दैनिक परिपाठ रचना आहे. प्रत्येक घटकाचा अंतर्भाव आहे.

    ReplyDelete
  10. अतिशय सुंदर व परिपूर्ण रचना केलेली आहे. अभिनंदन भागवत सर.💐💐👌👌💐💐👌👌

    ReplyDelete
  11. खुप छान सर

    ReplyDelete
  12. अतिशय परिपूर्ण असा दैनिक परिपाठ असतो. द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. एक विनंतीवजा सूचना करावीशी वाटते- सुविचार आणि सामान्य ज्ञान प्रश्न यांमध्ये पुनरावृत्ती होऊ नये.

    ReplyDelete
  13. Thank sirji 🙏गुरुवर्य सप्तरंगी परिपाठ शिक्षकांसाठी एक मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. आपण आपल्या पद्धतीने, कल्पकतेने त्यात बदल करून शाळेत परिपाठ घ्यावा.

    ReplyDelete
  14. कृपया सुविचार व सामान्य ज्ञान मधील प्रश्न सतत तेच तेच येत आहेत, त्यांची पुनरावृत्ती होऊ नये, ही अपेक्षा!

    ReplyDelete
  15. खूप छान आहे

    ReplyDelete
  16. अतिशय सविस्तर व उपयुक्त परिपाठ

    ReplyDelete
  17. अतिशय सुंदर

    ReplyDelete