परिपाठ

🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷
------------------------------------------ 
  🎄 *आजचा परिपाठ🎄
-----------------------------------------
         🔅 *पंचांग* 🔅
 तिथी - फाल्गुन पंचमी
 पक्ष - कृष्ण  
 शके - १९४५
 नक्षत्र : अनुराधा
 सूर्योदय - ६ वा.१४ मि.
 सूर्यास्त - ६ वा.३७ मि.
 दिनांक - ३०/३/२०२४
 वार - शनिवार  
 महिना : मार्च
 ----------------------------------------
      🔅 *सुविचार* 🔅
Do not be afraid to give up the good to seek the excellent. 
उत्कृष्ट शोधण्यासाठी चांगले सोडण्यास घाबरू नका.
------------------------------------------
       🔅 दिनविशेष 🔅 
३० मार्च  महत्वाच्या घटना :
 १८४२: अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.
१७२९: थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.
१६६५: पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.
३० मार्च जन्मदिन : 
 १९७७: अभिषेक चोब्बे - भारतीय संचालक आणि पटकथालेखक
१९४२: वसंत आबाजी डहाके - कोशकार, लेखक आणि कवी
१९३८: क्लाउस स्च्वाब - वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे स्थापक
१९०६: के. एस. थिमय्या - भारतीय भूदलाचे ६वे सरसेनापती 
१८९४: सर्जी इल्युशीन - इल्युशीन विमान कंपनीचे निर्माते 
३० मार्च निधन :
२०१२: अक्विला बेर्लास किंनी - भारतीय- कॅनेडियन समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक
२००५: ओ. व्ही. विजयन - भारतीय लेखक आणि चित्रकार 
२००२: आनंद बक्षी - गीतकार 
-----------------------------------------
       🔅 *बातम्या* 🔅
  सातारा: सातारा मतदारसंघातून शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, सुनील माने यांच्या नावावर चर्चा होणार.

सातारा: खासदार श्रीनिवास पाटील सातारा मतदारसंघातून लढणार नाही; प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय.

बनावट जातप्रमाणपत्र प्रकरण : अखेर नागपूरचे उपायुक्त चंद्रभान पराते यांची सेवा समाप्त

उमेदवारी अर्ज भरण्याबाबत संजय गायकवाडांकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “मी अर्ज भरला

कल्याण लोकसभेत ठाकरे गटाची मोठी खेळी, राष्ट्रवादीच्या सुधीर वंडारशेठ पाटील यांना उमेदवारी?

सागर बंगल्याची भीती नितेश राणे यांना, आम्हाला नाही; बच्चू कडू यांनी सुनावले

लहानपणीच्या आठवणींना उजाळा, मुंबई आता झोपडपट्टीमुक्त करणार, पीयूष गोयल यांचा मास्टरप्लॅन

सातारा : उदयनराजे यांचं नाव घेताच शरद पवार यांनी उडवली कॉलर
------------------------------------------
  🎄 **व्यक्तीविशेष* 🎄 🔅 वसंत आबाजी डहाके🔅
  १९७०नंतरच्या समकालीन समाजवास्तवावर भाष्य करणारी कविता लिहिणारे प्रभावी कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून वसंत आबाजी डहाके यांनी मराठी साहित्यविश्वावर तेजस्वी मुद्रा उमटवली आहे. पूर्वसुरींंचा व्यासंग आणि आधुनिक मराठी वाङ्मयाचे प्रगल्भ आकलन आणि पृथगात्म चिंतनशील भाष्य हे त्यांच्या समीक्षात्मक लेखनाचे गुणवैशिष्ट्य आहे.
वसंत आबाजी डहाके यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील बेलोर्‍यास झाला. त्यांचे वडील त्या गावचे पाटील होते. बेलोर्‍यास त्यांचे घर आणि शेती होती. डहाके दहा वर्षांचे होईपर्यंत बेलोर्‍यास राहिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेलोर्‍यास झाले. माध्यमिक शिक्षणासाठी ते चंद्रपूरला गेले. पाचवीपासून बी. ए.होईपर्यंत ते चंद्रपूरला राहिले. बी. ए.च्या पहिल्या वर्षाला असताना त्यांची ‘एक आगळा पक्षी’ ही कविता ‘सत्यकथा’ मासिकात प्रसिद्ध झाली. १९६५ पासून त्यांनी मराठीच्या अध्यापनास प्रारंभ केला. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे त्यांनी अध्यापन केले. १९६७मध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे त्यांनी मराठीचा व्याख्याता म्हणून काम पाहिले. त्यांनी १९७०मध्ये चंद्रपूर येथे मराठीचे अध्यापन केले. १९७१मध्ये अमरावतीच्या शासकीय महाविद्यालयात ते मराठीचे व्याख्याते होते. याच काळात त्यांनी ‘त्रिशंकू’ या लघु नियतकालिकाचे सहसंपादन केले. १९८२पासून मुंबईच्या एल्फिन्स्टन या नामांकित महाविद्यालयामध्ये त्यांनी मराठीचे अध्यापन केले. १९९४मध्ये ‘राज्य मराठी विकास संस्थे’त त्यांनी उपसंचालक म्हणून धुरा सांभाळली 
   १९७०नंतरच्या समकालीन समाजवास्तवावर भाष्य करणारी कविता लिहिणारे प्रभावी कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून वसंत आबाजी डहाके यांनी मराठी साहित्यविश्वावर तेजस्वी मुद्रा उमटवली आहे. पूर्वसुरींंचा व्यासंग आणि आधुनिक मराठी वाङ्मयाचे प्रगल्भ आकलन आणि पृथगात्म चिंतनशील भाष्य हे त्यांच्या समीक्षात्मक लेखनाचे गुणवैशिष्ट्य आहे.
वसंत आबाजी डहाके यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील बेलोर्‍यास ३० मार्च १९४२ रोजी झाला. त्यांचे वडील त्या गावचे पाटील होते. बेलोर्‍यास त्यांचे घर आणि शेती होती. डहाके दहा वर्षांचे होईपर्यंत बेलोर्‍यास राहिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेलोर्‍यास झाले. माध्यमिक शिक्षणासाठी ते चंद्रपूरला गेले. पाचवीपासून बी. ए.होईपर्यंत ते चंद्रपूरला राहिले. बी. ए.च्या पहिल्या वर्षाला असताना त्यांची ‘एक आगळा पक्षी’ ही कविता ‘सत्यकथा’ मासिकात प्रसिद्ध झाली. १९६५ पासून त्यांनी मराठीच्या अध्यापनास प्रारंभ केला. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे त्यांनी अध्यापन केले. १९६७मध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे त्यांनी मराठीचा व्याख्याता म्हणून काम पाहिले. त्यांनी १९७०मध्ये चंद्रपूर येथे मराठीचे अध्यापन केले. १९७१मध्ये अमरावतीच्या शासकीय महाविद्यालयात ते मराठीचे व्याख्याते होते. याच काळात त्यांनी ‘त्रिशंकू’ या लघु नियतकालिकाचे सहसंपादन केले. १९८२पासून मुंबईच्या एल्फिन्स्टन या नामांकित महाविद्यालयामध्ये त्यांनी मराठीचे अध्यापन केले. १९९४मध्ये ‘राज्य मराठी विकास संस्थे’त त्यांनी उपसंचालक म्हणून धुरा सांभाळली.
कवितेच्या क्षेत्रात नव्या पाऊलखुणा उमटविण्यात डहाके यांच्या कवितेने महत्त्वपूर्ण वाटा उचललेला आहे. त्यांच्या जाणिवेचा अवकाश अत्यंत व्यापक आहे. जागतिक महत्त्वाच्या घटनांचा, समकालीन विचारप्रवाहाचा आणि वाङ्मय प्रकारात घडलेल्या नव्या परिवर्तनांचा संस्कार त्यांनी मनात मुरवून घेतलेला आहे. सार्‍या मंथनप्रक्रियेतून डहाके यांची कविता नवी प्रतिमासृष्टी घेऊन जन्मास येत होती. समकालीन कवींच्या समानधर्मीपणाशी ती संवाद साधत होती. आयुष्यामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी झालेली स्थलांतरे त्यांच्या अनुभवविश्वात नवी भर टाकत होती. त्यांच्या चित्तातील अस्वस्थता भावात्मक आणि सर्जनात्मक अनुभूतींना नवी प्रेरणा देत होती.सत्यकथा’ मासिकाच्या मे १९६६च्या अंकात त्यांची ‘योगभ्रष्ट’ ही प्रदीर्घ कविता प्रसिद्ध झाली. ‘योगभ्रष्ट’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९७२ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातील सर्व कविता १९६६ ते १९७१ या काळातील आहेत. त्यांच्या कवितांतून आणि रेखाटलेल्या चित्रांतून त्यांच्या अंतर्मनातील तीव्र तडफड, अस्वस्थता आणि उद्रेक हे सारे अत्यंत पारदर्शी शब्दांत प्रकट झाले आहे. मनातील भावकोमल मृदू स्वर या कवितेत समांतरपणे मुखर झाले आहेत. प्रेमविषयक अनुभूती त्यांनी उत्कटतेने व्यक्त केली आहे. समकालीन समाज-वास्तवाचा सारा दाह आणि व्यक्तिमनातील प्रक्षोभ, उद्वेग त्यांच्या ‘योगभ्रष्ट’ या संग्रहातील कवितेतून व्यक्त होतो.
---------------------------------------
   🎄 *सामान्यज्ञान* 🎄
      आयुर्वेदिक वनस्पती 
        🔅कायफळ 🔅 
कायफळ  ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ह्या वनस्पतीची फुले लालसर गुलाबी रंगाची व आंबट-गोड असतात. तिच्या फळालाही कायफळ म्हणतात. हे फळ मात्र चवीला तुरट-कडू-तिखट असते.
कायफळाच्या चूर्णाचा वास घेतल्यावर खूप शिंका येतात आणि डोकेदुखी-सर्दी बरी होते. 
कायफळ खोकल्यावर, दातदुखीवर, त्वचारोगावर आणि जखमा साफ करण्यास व त्याची पूड सुगंधी उटण्यात वापरली जाते.
----------------------------------------
      🔅 *वाक्प्रचार* 🔅
  आराम करणे - विश्रांती घेणे
----------------------------------------
         🔅 *म्हण* 🔅
 साखरेचे खाणार त्याला देव देणार - भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते .
-----------------------------------------
       🔅इंग्रजी प्रश्न 🔅
1) How many colors are there in the national flag of India?
Ans : Three
2) Which color is at the top of the national flag of India?
Ans: Saffron
3) Which color is in the center of the national flag of India?
Ans: White
4) Which is the lowest color in the national flag of India?
Ans: Green
5) How many spoke are there in Ashoka Chakra in India's national flag?
Ans : 24
------------------------------------------
       🎄 *प्रार्थना*🎄
   🔅शोधिशी मानवा🔅
 शोधिशी मानवा, राऊळी मंदिरी नांदतो देव हा, आपुल्या अंतरी

मेघ हे दाटती, कोठुनी अंबरी सूर येती कसे, वाजते बासरी रोमरोमी फुले, तीर्थ हे भूवरी दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी

गंध का हासतो, पाकळी सारुनी वाहते निर्झरी, प्रेमसंजीवनी भोवताली तुला, साद घाली कुणी खूण घे जाणुनी, रूप हे ईश्वरी

भेटतो देव का पूजनी अर्चनी पुण्य का लाभते, दानधर्मातुनी शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी
-----------------------------------------
      🔅मनाचे श्लोक 🔅
मना वासना चूकवीं येरझारा।
मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥
मना यातना थोर हे गर्भवासीं।
मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥
मना सज्जना हीत माझें करावें।
रघुनायका दृढ चित्ती धरावें॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥
न बोलें मना राघवेवीण कांहीं।
जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥
घडिने घडी काळ आयुष्य नेतो।
देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥
रघुनायकावीण वांया शिणावे।
जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे।
अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥
मना वीट मानूं नको बोलण्याचा।
पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥
सुखाची घडी लोटतां सूख आहे।
पुढें सर्व जाईल कांही न राहे॥२५॥
------------------------------------------
     🎄 बडबडगीत 🌲 
   🔅गोरी गोरीपान 🔅
गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण ।।धृ।। दादा, मला एक...

गोर्‍या गोर्‍या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण ।।१।। दादा, मला एक...

वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान ।।२।। दादा, मला एक...

वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान ।।३।। दादा, मला एक...
------------------------------------------
         🌲समूहगीत🌲 
    🔅माणूस माझे नाव🔅
माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव...
बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातहि सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव...
मीच इथे ओसाडावरती
नांगर धरुनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव...
ही शेते अन् ही सुखसदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव...
सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव...
-----------------------------------
      🌲 *बोधकथा*🌲 🔅कबूतर आणि शिकारी  
 कबूतर आणि शिकारी 
एका जंगलामध्ये खूप सारे कबूतर एकत्र राहात होते. एका शिकाऱ्यांना या जंगलामध्ये राहणाऱ्या कबुतरांची चाहूल झाली व त्याने या कबुतराला पकडण्यासाठी एक युक्ती केली. शिकारी आणि कबूतर राहणाऱ्या आसपासच्या जागेमध्ये जाळी घातले व त्या जाळांमध्ये डाळींबाचे बी अंथरले.
तेथे एक कबुतरांचा थवा आला व त्या थव्यातील कबूतरांनी केवळ डाळिंबी चे बी पाहिले व ते बी खाण्यासाठी कबुतरखाने जाळ्यावर झेप घेता सर्व कबूतर जाळ्यामध्ये अडकले.तेव्हा सर्व कबुतरांच्या लक्षात आले की आपण एखाद्या शिकाऱ्याच्या कावडी मध्ये सापडला त्या आजारातून सुटका करण्यासाठी एक एक कबूतर बळ मिळवून देण्याचा प्रयत्न करू लागली पण एकाही कबुतराला जाळ्यातून सुटका करता आली नाही. सर्व कबूतर हा तास झाले व त्यांना वाटले की आता आपण शिकार होणार तेवढा कबुतराच्या थव्यातील एक म्हातारी कबूतर पुढे आले व सर्व कबुतरांना सांगत ते म्हणाले, ” एकट्याच्या बलाने हे जाळ उडणे अतिशय कठीण आहे परंतु सर्व कबुतराने एकसाथ मिळून ताकद लावली तर आपण हे सर्व जाळे घेऊन पडू शकतो.”
म्हाताऱ्या कबुतरा चे बोलणे सर्व कबुतरांचा लक्षात आले व सर्वांनी एक साथ मिळून ताकत लावताच जाळे उडाले व सर्व कबूतर जाळ्यात सोबत पळून गेले अशा प्रकारे सर्व कबुतरांची शिकाऱ्याच्या हातातून सुटका झाली.
तात्पर्य: एकीचे बळ 
------------------------------------------
       🔅 प्रश्नमंजुषा 🔅
१) शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
उत्तर : शिवनेरी
२) स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून
शिवरायांनी कोणत्या किल्ल्याची निवड केली ?
उत्तर : राजगड
३) रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?
उत्तर : रायरी किल्ला
४) शिवरायांनी भोरप्या डोंगरावर कोणता
नवीन किल्ला बांधला ?
उत्तर : प्रतापगड
५) शिवरायांनी अफजलखानाचा वध
कोणत्या किल्ल्यावर केला ?
उत्तर : प्रतापगड
🔸🔸  🔸🔸🔸🔸🔸🔸
-----------------------------------------

41 comments:

  1. एक परिपूर्ण ब्लॉग ...👌👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर व परिपूर्ण रचना केलेली आहे. अभिनंदन भागवत सर.💐💐👌👌💐💐👌👌

    ReplyDelete
  3. खूप छान सर 👌👌

    ReplyDelete
  4. दैनंदिन परिपाठ उपक्रम हे विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भावी आयुष्यातील वाटचालीस नकळत संस्कार प्रदान करत असते,आणि एक सज्जन नागरिक तयार होण्यास याच संस्कारांची अत्यन्त गरज आहे, आणि तेच संस्कार परिपाठ या माध्यमातून आपण देत असतो, तुमचे दैनंदिन परिपाठ आम्हाला खूप उपयुक्त ठरते, thanks bhagwat sir,

    ReplyDelete
  5. आपला परीपाठ इंग्रजी मधून मीळतो का ?

    ReplyDelete
  6. खूप खूप छान माहिती असते...

    ReplyDelete
  7. खूपच सुंदर परिपाठ,,,

    ReplyDelete
  8. खूपच छान दैनिक परिपाठ रचना आहे. प्रत्येक घटकाचा अंतर्भाव आहे.

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर व परिपूर्ण रचना केलेली आहे. अभिनंदन भागवत सर.💐💐👌👌💐💐👌👌

    ReplyDelete
  10. खुप छान सर

    ReplyDelete
  11. अतिशय परिपूर्ण असा दैनिक परिपाठ असतो. द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. एक विनंतीवजा सूचना करावीशी वाटते- सुविचार आणि सामान्य ज्ञान प्रश्न यांमध्ये पुनरावृत्ती होऊ नये.

    ReplyDelete
  12. Thank sirji 🙏गुरुवर्य सप्तरंगी परिपाठ शिक्षकांसाठी एक मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. आपण आपल्या पद्धतीने, कल्पकतेने त्यात बदल करून शाळेत परिपाठ घ्यावा.

    ReplyDelete
  13. कृपया सुविचार व सामान्य ज्ञान मधील प्रश्न सतत तेच तेच येत आहेत, त्यांची पुनरावृत्ती होऊ नये, ही अपेक्षा!

    ReplyDelete
  14. खूप छान आहे

    ReplyDelete
  15. अतिशय सविस्तर व उपयुक्त परिपाठ

    ReplyDelete
  16. अतिशय सुंदर

    ReplyDelete